पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी नुकतेच मोठे वक्तव्य केले आहे. आशिया चषक खेळण्यासाठी भारताला पाकिस्तानात यायचे नसेल, तर हरकत नाही, असे त्यांचे मत आहे. भारताला तटस्थ ठिकाणी सामना देण्यास तयार असल्याचे सेठी यांनी सांगितले.
सेठी म्हणाले, “आम्ही या हायब्रीड मॉडेलवर निर्णय घेतला आहे की पाकिस्तान त्यांचे आशिया कप सामने घरच्या मैदानावर खेळेल आणि भारत त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी खेळेल आणि आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेकडे तसा प्रस्ताव देत आहोत,” सेठी म्हणाले.
पाकिस्तानने भारतासोबत समान अटींवर क्रिकेट खेळावे, असा आपल्या देशातील जनतेचा मूड असल्याचे सेठी यांनी सूचित केले. पीसीबीने प्रस्ताव दिला आहे की भारत आपले आशिया कप सामने तटस्थ ठिकाणी खेळू शकेल, तर पाकिस्तान आणि इतर प्रतिस्पर्धी संघ यजमान देशात खेळतील.
दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता आणि खंडीय स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. 2 ते 17 सप्टेंबर दरम्यान 6 संघांचा आशिया कप खेळला जाणार आहे. मात्र, मैदानाबाबत सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.
संबंधित बातम्या