श्रीलंका संघाचा माजी अनुभवी सलामीवीर सनथ जयसूर्याने हे तथ्य फेटाळून लावले की जास्त क्रिकेटमुळे ‘बर्नआउट’ (अत्यंत शारीरिक थकवा आणि मानसिक ताण) होत आहे. डावखुऱ्या फलंदाजाने म्हटले आहे की, सर्वोच्च स्तरावरील क्रिकेटपटूची कारकीर्द खूपच लहान असते, त्यामुळे त्याने त्याचा पुरेपूर वापर करून आपल्या फिटनेसची काळजी घेतली पाहिजे.
सनथ जयसूर्या, 53, शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “हे वैयक्तिक मत आहे आणि त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. खेळाडूंची कारकीर्द लहान असते आणि त्यांनी या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे.
हे पण वाचा | मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्जला हरवेल – युसूफ पठाण
1996 च्या विश्वचषक स्पर्धेतील ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या जयसूर्याला वाटते की खेळाडूच्या तंदुरुस्तीला खूप महत्त्व आहे, कारण यामुळे खेळाडू विविध टी-20 लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करू शकेल.
तो म्हणाला, “तुम्ही या गोष्टी नाकारू शकत नाही… शेवटी खेळाडूने ठरवायचे असते की त्याचे शरीर किती क्रिकेट खेळू शकते.”
GT vs KKR ड्रीम 11 टीम
संबंधित बातम्या