बुधवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना खेळला गेला, जो पाहुण्या संघाने 21 धावांनी जिंकला. यासह कांगारू संघाने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी ही मालिका एका दुःस्वप्नासारखी गेली. तिन्ही सामन्यांमध्ये तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या या खराब कामगिरीचा बचाव केला आहे.
तिसर्या एकदिवसीय सामन्यानंतर पत्रकार परिषदेत 35 वर्षीय रोहित म्हणाला, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव केवळ तीन चेंडू खेळू शकला हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे कोणालाही होऊ शकते. तीन उत्कृष्ट चेंडूंवर तो बाद झाला. या सामन्यात (तिसरा एकदिवसीय) येत असताना, त्याने चुकीचा शॉट निवडला.
तो पुढे म्हणाला, “आम्ही त्याला आधीच ओळखतो, तो फिरकीविरुद्ध चमकदार फलंदाजी करतो, म्हणून आम्ही त्याला नंतरसाठी वाचवले, जेणेकरून तो शेवटच्या 15-20 षटकांमध्ये मुक्तपणे फलंदाजी करू शकेल. हे कोणालाही होऊ शकते, परंतु त्याच्याकडे प्रतिभा आणि क्षमता दोन्ही आहे.”
मालिकेच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवला मिचेल स्टार्कने एलबीडब्ल्यू आऊट केले होते. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यातही तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट झाला, तर बुधवारी तो अॅस्टन अगरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.
यावेळी CSK जिंकणार आयपीएलचे विजेतेपद! व्हिडिओ
32 वर्षे.
संबंधित बातम्या