भारतीय निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांचे पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना संघात स्थान मिळाले नाही.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव यादव. .
संबंधित बातम्या